आमच्याविषयी
मृद व जलसंधारण विभाग, अकोला
आमचे ध्येय
मृद व जलसंधारण विभाग, अकोला, महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत कार्यरत असून, मृदा व जल संसाधनांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचे कार्य करते. विभागाचे मुख्य उद्दिष्ट शाश्वत शेती विकास, जलसंधारण, मृदसंधारण, आणि ग्रामीण भागाचा आर्थिक विकास साधणे आहे.
इतिहास
महाराष्ट्र शासनाने ५ जून १९९२ रोजी जलसंधारण विभागाची स्थापना केली. या विभागाकडे जलसंधारण, मृदसंधारण, एकात्मिक पाणलोट विकास, लघु सिंचन, पडीक जमीन विकास यासारख्या महत्वपूर्ण केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांचे संनियंत्रणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
प्रमुख कामगिरी
- ५०,००० हेक्टरवर मृदसंधारणाचे कार्य
- १०,००० पेक्षा अधिक जलसंधारण संरचना उभारणी
- ५०० हून अधिक गावांमध्ये यशस्वी प्रकल्पांची अंमलबजावणी
- सततच्या समोच्च खंदकांसारख्या नवकल्पनांची अंमलबजावणी
आमचे नेतृत्व

श्री. संजय राठोड
मा. मंत्री, मृद व जलसंधारण

श्री. इंद्रनील नाईक
मा. राज्यमंत्री, मृद व जलसंधारण
